बसमध्ये अचानक धूर येउ लागला, धूर वाढत असल्याचे पाहून बस कंडक्टरने प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
पुणे - पुण्यात मंगळवारी मोठी दुर्घटना टळली. येथील राज्य परिवहन बसला(शिवशाही) अचानक आग लागली. येरवडा परिसरातील शास्त्री चौकाजवळ हा अपघात झाला. अपघात झाला तेव्हा बसमध्ये ४२ प्रवासी होते. मात्र, सुदैवाने सर्वजण बचावले.
आग आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बसमध्ये अचानक धूर येउ लागला, धूर वाढत असल्याचे पाहून बस कंडक्टरने प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
COMMENTS